Ladki Bani Yojana लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभ घेत आसलेल्या महिलांच्या अर्जांची छाननी आता सुरू आहे. आता या योजनेत पुन्हा नवीन अटी लावन्यात येनार आहेत यामुळे राज्यातील अनेक महिला अपात्र ठरनार आहेत.
तर आता योजनेत कोनत्या नवीन अटी लावन्याच आलेल्या आहेत आणि कोनत्या महिलांचे हप्ते बंद होनार आहेत पाहूयात…
लाडकी बहीण योजनेत पुन्हा या नवीन अटी
1) नारी शक्ती दूत ॲप वरून अर्ज करणाऱ्या महिलांसाठी १ जुलै २०२४ रोजी त्यांचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे, तर वेब पोर्टल वरून अर्ज करणाऱ्या महिलांसाठी हे वय ३० सप्टेंबर २०२४ रोजी २१ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे. जर नसेल तर त्या महिला लाभार्थी महिलेला अपात्र ठरविण्यात येनार आहे…
2) वयाची पडताळणी करताना, आधार कार्डवरील जन्मतारीख आणि इतर कागदपत्रांवरील जन्मतारीख समान असणे गरजेचे आहे. यात कोणताही फरक आढळल्यास अर्ज अपात्र ठरवला जानार आहे.
3) १ ऑगस्ट २०२५ पर्यंत ज्या महिलांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असेल, त्यांना या योजनेतून वगळण्यात आले/येनार आहे.
4) एकाच शिधापत्रिकेवर (रेशन कार्ड) फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेऊ शकते. जर एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला, उदा. सासू आणि सून, किंवा दोन जावा या योजनेचा लाभ घेत असतील, तर त्यापैकी केवळ एकच महिला पात्र ठरेल.
5) जर एकाच कुटुंबातील दोन बहिणींनी अर्ज केला असेल, तर त्यापैकी एक अर्ज अपात्र ठरवला जाईल.
6) योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर शिधापत्रिकेत काही बदल केला असल्यास, जुने शिधापत्रिकाच ग्राह्य धरले जाईल.
7) योजनेच्या नियमांनुसार परप्रांतीय महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.आणि स्थलांतरित लाभार्थ्यांची तपासणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरवापर टाळता येईल…